काही भेटी आयुष्य घडवितात
तर काही आयुष्य मिटवतात
किती वेळा भेटी झाल्या
यापेक्षा महत्वाची त्यांची साध्यता
सुखी व्हायला असतो पुरेसा एक क्षण
त्याहूनही सलतो कधीही भरून न निघणारा व्रण
सुख काय दुःख काय दोघे सख्खे भाऊ भाऊ
आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा करू नका बाऊ
